Saturday, August 18, 2012

पाउस......तुमचा आमचा....!!!

              गेले 2-3 दिवस खूप विचित्र  वाटत होतं , काहीतरी रिकामं  असल्यासारख, काहीतरी हरवलंय ,सापडत नाहीये,गमावलंय कि सुटत चाललंय. तसं पाहता काय नाहीये माझ्याकडे? छान घर,फिरायला गाडी, गरजे पुरते किवां थोडेशे जास्तं शिल्लक राहतील इतके पैसे, आवडीचं काम....मग चुकतंय कुठे? पण खूप एकट  वाटतंय .जवळची माणसं  आसपास दिसत नाही म्हणून? फोन वर बोलणं, skype करणं ह्या वरवरच्या आणि तात्पुरत्या औषधांनी बरा होणारा रोग नाहीये हा. लांब राहिल्यानं नात्यातील ओलावा संपणार तर नाही ना हि धास्ती, मातृत्वाच्या उंबरठ्यावर उभारलेल्या माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणीच्या संसाराची नौका डगमगत चालली आहे, तिला आधार द्यायला न जाता येण्याच हताशपण मनाला सैरभैर करत आहे. अमेरिकेत राहणं म्हणजे सोन्याचा पिंजरा वाटू लागलं आहे. असे आणि अनेक विचारांचा थैमान घेऊनच निद्राधीन झाले.
           सकाळी उठले ते विजेच्या कडकडाटाने, खूप छान वाटले वेळेच्या आधीच का असेना गजराच्या कर्कश्य आवाजाने न उठता जाग आली, एक छोटीशी achievement वाटली.वाफाळलेला आलं -वेलची चा चहा घेऊन वरांड्यात बसले.समोर होत्या मुसळधार पावसाच्या सरी. टपोरे स्वत्छंद थेंब टप टप जमिनीवर पडत होते. मग आठवला  तो शाळेत असतानाचा पावसाळा. जून चा पावसाळा सर्वच बदलून टाकायचा. नवीन वर्ग ,नवीन शिक्षिका, नवीन अभ्यास,नवीन वह्या-पुस्तकं , महिन्याभराच्या भेटीनंतर मैत्रीणीना झालेला आनंद सगळच नवीन आणि हवहवंसं. cycle ने शाळेला न जाता बाबा सोडायला येणार हा आनंद देणारा. पावसामुळे प्रार्थना आणि P .T चा तास वर्गातच बसावे लागणार हे दुख देणारा. खेळायला बाहेर जाण्यासाठी पाऊस जाण्याची वाट पाहणे, तसेच नवीन रेनकोट,छत्री मिरवण्यासाठी पाऊस येण्याची वाट पाहणे. कधी "येरे येरे पावसा " म्हणणे तर कधी "Rain rain go away, come again another day" म्हणणे असा कधी आवडता तर कधी नावडता.खरतर पाऊस तोच असतो वेगळा असतो तो दृष्टीकोन किवां परिस्थिती. परवाच एक उदाहरण वाचल किवा टिव्ही वर ऐकल्याचा आठवतंय. एका माणसाला दोन विवाहित मुली. मोठी चा नवरा शेतकरी. तिला भेटायला गेल्यावर ती म्हणते बाबा पाऊस लौकर आला पाहिजे नाहीतर पेरणी वाया जाईल. धाकटीला भेटायला गेला तिचा नवरा कुंभार, ती म्हणते बाबा पाऊस लौकर नाही आला तर बार होईल नाहीतर खूप नुकसान होईल. आला का आता यक्ष्य प्रश्न ?देवाकडे काय मागवा पाऊस यावा का न यावा?खरंतर त्याच्या हातात काहीच न्हवते. शेवटी त्याने दोघींना एकत्र बोलावले व म्हणाला पाउस आला, पिकं चांगली झाली तर मोठीने धाकटीला मदत करावी आणि पाउस नाही आला, धंदा चांगला झाला तर धाकटीने  मोठीला मदत करावी. असा पावसावर अवलंबून असलेला प्रश्न बिनपावासाचाच सोडवला.
        पाऊस ......प्रत्येकासाठी वेगळा असतो. चातक,शेतकरी प्रेमी युगुल ह्यांना हवाहवासा. तर रस्त्यावरील दुकानदार, चालत, दुचाकीने कामाला जाणार्यांना नकोनकोसा....पाऊस एकंच दृष्टीकोन अनेक.....माणसांचा हि तसच नसतं का? एकच व्यक्ती कोणाचा मित्र तर कोणाचा शत्रू, कुणीतरी त्याच्याशिवाय जगू शकत नाही आणि कुणीतरी त्याच्या सोबत.अगदी वेगवेगळी माणसं कशाला एकाच माणूस घनिष्ट मित्र, सखा सोबती आणि भांडण झाल्यावर तोच व्यक्ती नकोनकोसा होतो. व्यक्ती तोच असतो परिस्थिती वेगळी, पण आपण माणसाना दोष देत बसतो. विचारांची लागलेली तंद्री वाऱ्याने आलेल्या तुषारांनी भंग केली.पाहिलं तर सरीचा जोर ओसरला होता. रस्त्याच्या बाजूने पाणी वाहत होतं. अंगणातील धूळ,कचरा,पाला-पाचोळा सोबत घेऊन, मागे राहिलं होता स्वच्छ अंगण आणि ताजेतवाने वातावरण. आपसूकच पाऊले बाहेरच्या दिशेने वळली.......पावसाकडे......जणू पाऊस येताना माझ्या प्रश्नांची उत्तर सोबतच घेऊन आला होता. डोळे आकाशाकडे टक  लावत होते......जणू त्याला साद घालत होते......बरस मोठ्याने बरस.....इतका कि अगदी मनापर्यंत पोहोच.मनातलं सगळ दुख, सगळी मळभ वाहून ने. मागे ठेव, टवटवीत ताजातवानं मन,नकोसा कचरा दूर कर आणि स्वच्छ कर माझ्या मनाला. मनसोक्त चिंब भिजले पावसात. 
       आता सर्व खरतर तेच आहे अगदी तसंच. पण बदलला आहे तो फक्त माझा दृष्टीकोन...........नवीन,स्वच्छ  आणि आनंदी.............

आपलीच 
चारुता......:-)

Tuesday, March 6, 2012

LIFE : A PARTY

Facebook वर timepass करता करता एक status वाचनात आल " Life's like a party. You invite a lot of people. Some leave early, Some come late, some stay, some laugh with you, some at you. Some don't come. But in the end, after the fun, there will be a few who will stay and help clean up the mess with you. And most of the time, those were the ones who didn't even make the mess. Those are the people u shud worry abt losing! The rest just come n go " मग नेहेमी प्रमाणे विचार चक्र सुरु झालं, हे किती तंतोतंत खरं आहे नाही का? आपल्या आयुष्यात शेकडो व्यक्ती येतात किवा असं म्हणा ये जा करतात. काही भूतकाळ होतात काही वर्तमान काळात असतात काही भूतकाळात येऊनही भविष्यकाळाची स्वप्नं आपल्या सोबत पाहतात. काही लोक नातेवाईक बनून आपणहून येतात काही लोक मित्र बनून नकळत येतात. आपल्याला option असतो तो केवळ मित्र choose करण्याचा. ह्या वरच्या वाक्यातली mess clean करणारे बहुतांशी आपले मित्रच असतात. आपला मित्र आपल्याला जसा आहे तसा स्वीकारतो infact म्हणूनच तो आपला मित्र असतो. आपल्यातले गुण माहित असोत किवा नसोत दुर्गुण त्याला नक्की माहित असतात आणि ते स्वीकारून ते त्या प्रमाणे आपल्याशी वागत असतो. कुणाला उशिरा पोहोचण्याची सवय असेल तर त्याचा मित्र त्याला वेळेच्या २ तास आधीच येण्यास सांगतो, ह्याला म्हणतात acceptance जे मित्र नेहेमी करत असतात. ह्याचं कारण मैत्र हे दोन मनानंमधल नातं असतं त्याच्या देह बोलीशी व्यावहारिक पणाशी वयाशी काहिही संबंध नसतो. मैत्री कोणामध्येही होऊ शकते एक आजोबा आणि नात एक मेकांचे घनिष्ट मित्र होऊ शकतात. माझ्या लहान पाणी माझा BEST FRIEND माझा जोबा (लाडाने आजोबा ना मी जोबा म्हणायचे) होता. एक शिक्षक आणि एक विद्यार्थी हि BEST FRIEND होऊ शकतात. एक BOSS आणि त्याचा EMPLOYEE हि असू शकतात. जेव्हा दोन व्यक्ती एक मेकाचे खरे मित्र असतात तेव्हा ते दुसऱ्या relation शी मैत्रीची गल्लत कधीच करत नाहीत. गल्लत करतो ते समाज असतो. सगळ्यात वादग्रस्त ठरत असते ती स्त्री आणि पुरुषाची मैत्री. प्रत्येक वेळेला त्यांच्या मैत्री मध्ये INTIMACY च असते असं ग्रह करण्यास त्या दोन व्यक्ती सोडून इतर समाजाला (देव जाणे कुठून) वेळ आणि रस असतो. सर्व सामान्य समाज RATIONAL THINKING करणार हि कुठून? म्हणून तर कदाचित त्यांना सर्व सामान्य किवा MEDIOCRE म्हटलं जातं. RATIONAL THINKING सर्वांनाच जमत आणि सर्वांनाच पटतं असं नाहीये. FRIENSHIP आणि INTIMACY ह्या दोन वेगळ्या आणि दोन्ही हि खूप शुद्ध भावना आहेत. आपला जोडीदार हा आपला मित्र असावा हे बरोबर. हि अपेक्षा प्रत्येक व्यक्तीची असते कारण प्रेमा बरोबर  आपल  मन समझून घेण्याची दुसरी भूमिका जर आपल्या जोडीदाराने केली तर आयुष्य सुरळीत आणि अनादी होतं. कारण प्रत्येक व्यक्तीला आपला मन समझून घेणारा एक मित्र हवा असतो. कारण जिथे प्रेम येत तिथे हक्क, POSSESIVENESS ह्या हि भावना येतात तिथे कधी कधी मनाची कोंडी होऊ शकते तिथे हवा असतो ते एक मित्र. मग ते मुलगा आहे कि मुलगी, सर आहे कि नोकर, आजोबा आहे कि काका ह्याला महत्व नसतं, महत्व असतं ते त्याच्या भावनेला, त्याच्या मनाला, त्याच्या मनातल्या आपल्या काळजीला.
आजकाल च्या आमच्या पिढीची BEST FRIEND ची definition  हि आहे कि रात्री ४ वाजता हि हक्काने काल करून उठवू शकतो ते खरं मित्र. एकदम simple आणि सोप्पी. पण असेही ३-४ मिळतील. पण असाहि  ऐक मित्र असेल कि जो हा विचार करेल कि ४ वाजता call करण्याची वेळाही येऊ नये. आणि समझा त्याला तुमचा phone आलाच तर नक्की काय झालंय हे हि त्याला न सांगता बहुतांश वेळा कळेल. आजच्या पिढीचे definitions बदलले आहेत पण ते किती RATIONAL झाले आहेत ह्यात मला खरच शंका वाटते. आपण मजा पैसा status ह्या मागे इतके धावतो आहे कि आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्ती कडे OCCUPATIONAL POINT OF VIEW ने पाहतो आहे. ती स्वच्छंदी निर्मळ मैत्री त्यातले हसू त्यातले समाधान अनुभवायला वेळच नाहीये. जरा डोकवा आपल्या आजूबाजूला शोध ते एक मन, ती एक व्यक्ती ज्याला तुम्ही १०० टक्के माहिती आहात. तुम्ही काही हि आणि कसे हि वागू शकता तिच्याशी/त्याच्या शी. मित्र फक्त समवयस्क च असतात असं नाही विचार तुमच्या मनाला ती तुमची आई आत्या classmate collegue अगदी बाजूच्या बिल्डिंग मधली कोणी मुलगी हि असू शकते किवा कोपऱ्या वरचा किवा नाक्यावर थांबणारा गल्लीतला मुलगा हि असू शकतो. 
LIFE जर एक PARTY असेल तर येणाऱ्या सर्वांचे आदरातिथ्य करा अगदी आवडत्या आणि नावडत्या लोकांचे हि. पण थोडासा respect  थोडीशी कदर त्यांची हि करा जे नेहेमी तुमची साथ द्यायला तयार आहेत. त्यांच्या सोबत MESS CLEAN करा तुमच्या party  ची हि आणि त्यांच्या PARTY ची हि.